मिसळपाव प्रतिष्ठानची नोंदणी करुन त्यावर लेख लिहुन नंतर सरपंचांनी पोबारा केला असला तरी हा विषय लोक विसरलेले नाहीत. त्या अनुषंगाने आलेल्या ह्या काही प्रतिक्रिया. आधीच्या धाग्यात अवांतर नको म्हणून इथे नवा धागा सुरु करत आहोत. नोंद घ्यावी..
----
ते मिसळपाव प्रतिष्टान करणार आहेत त्याबद्दल काही तरी जास्त कळेल का? प्रतिष्ठान झाले पण त्याचा नोंदणीक्रमांक माहिती आहे का कुणाला.
मिसळपाव प्रतीष्ठानचा पहिला पुरस्कार डॉ. माधवी गाडगीळ यांना मराठी संकेतस्थळांवरील त्यांच्या योगदानाबद्दल (आणी वैद्यकिय क्षेत्रातील कामगीरीबद्दल) देण्यात येणार आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे. मात्र आणीबाणी लागु असल्याने त्याची कारणे जाहीर केली जाणार नाहीत असे माहीतगारांकडुन कळते. अर्थात या प्रतीष्ठानचा प्रमुख तात्यासरपंचच असल्याने दुसरी अपेक्षा तरी काय असणार?
बा**ला !!भां*द मग दुसरा पुरस्कार रोशनीला मरणोत्तर का ?
मुळात खरोखर प्रतिष्ठान रजिस्टर झाले कशावरून. नोंदणीक्रमांक कुणाला माहिती आहे का?
---
Sunday, June 14, 2009
Friday, May 29, 2009
जालावरचा जातियवाद..
वस्तुनिष्ठ ह्यांनी पाठवला आहे आधुनिक महाराष्ट्रातला जालावरील तथाकथित सुशिक्षीत लोकांचा जातियवाद! खरंच विचार करण्याजोगी गोष्ट...
--------------------------------------------
मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..
आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..
"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."
आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..
"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."
आपला,
(प्रांजळ) तात्या.
------------------------------------------------
वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..
--------------------------------------------
मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..
आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..
"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."
आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..
"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."
आपला,
(प्रांजळ) तात्या.
------------------------------------------------
वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..
Friday, May 1, 2009
बेसनलाडू वि. सरपंच
मिसळपाव वर झालेल्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी बेसनलाडू ह्यांनी पाठवलेले त्यांचे आणि तात्या ( अनेक आयडी) ह्यांचे प्रतिसाद (जे दारुच्या अंमलाखाली लिहिले गेल्याने आता उडवले गेले आहेत) इथे खास मिसळप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. हे लिखाण पुरवल्याबद्दल बेसनलाडूंचे विशेष आभार!
-मिसळप्रेमी
----
विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.
(सांदर्भिक) बेसनलाडू
विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!
असो, धमाल कट्टा!
आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!
बाय द वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो व त्यात मिपाद्वेष जाणवतो..!
असो..
तात्या.
मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल द बेस्ट!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,
शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!
आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!
तात्या.
मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.
मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे इ.)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही न बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.
माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री इ.) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
असं का?
पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.
कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?
सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला
तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.
तात्या.
संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!
खरा डॉन ऊर्फ तात्याः
>>त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.
कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!
संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!
खरा डॉन
गारंबीचा बापूः
सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.
गारंबीचा बापू
मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!
बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!
(स्वच्छंद)बेसनलाडू
विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..
तात्या.
-मिसळप्रेमी
----
विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.
(सांदर्भिक) बेसनलाडू
विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!
असो, धमाल कट्टा!
आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!
बाय द वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो व त्यात मिपाद्वेष जाणवतो..!
असो..
तात्या.
मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल द बेस्ट!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,
शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!
आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!
तात्या.
मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.
मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे इ.)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही न बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.
माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री इ.) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
असं का?
पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.
कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?
सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला
तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.
तात्या.
संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!
खरा डॉन ऊर्फ तात्याः
>>त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.
कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!
संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!
खरा डॉन
गारंबीचा बापूः
सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.
गारंबीचा बापू
मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!
बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!
(स्वच्छंद)बेसनलाडू
विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..
तात्या.
Thursday, April 30, 2009
जंक्शन
ही बघा मिसळपावच्या मस्तवाल संपादक मंडळाने नाकारलेली माझी कविता
जंक्शन
कुण्या सकाळी कवि खरडतो
मारुनमुटकुन कविता एक
जुन्या कल्पना घासुनिपुसुनि
फेक जरा तू पुन्हा फेक
मोर म्हणजे काय हो बाबा
पोर विचारी बापाला
मोर भारी शिग्रेट असते
बाप खेकसे पोराला
"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
केतकी आता म्हातारी झाली
तुझी तू दुसरी शोध ना बाबा
खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतो अपुले पोर.
काय? 'हैदोस' तुझ्या हातात?
बापापेक्षा पोरच थोर
खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
बाबा आता काय उपयोग?
तुम्ही तर राळे सुपातले
"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
ऍन्ड्रोपॉज निव्वळ थाप
अजुनि कणखर बघ प्रकृती
"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले ककीळ कुंजन..?
चौफुल्यावर दौलतजादा
बाई असली झकास जंक्शन
"पुर्वीची ती माणसे पोरा
खुप खुप मागस होती
'केसरी' च्या सेकंड हनीमूनला
वायग्रा घेऊन जात होती
"भात म्हणुनी तांदुळ अख्खा
शिजवुनी ते होते खात
चाळीशीतल्या मधुमेहाने
लिबिडोचीही लागे वाट
"आता कशी बघ आपण
जेवण म्हणुनी खातो गोळी
मुक्त नागवे सगळे आपण
कुठली साडी कुठली चोळी
"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
कसली पुचाट तुझी जवानी
स्वप्नी मल्लीका, मिठीत उशी
"झोप आता पोरा गुपचुप
रात्र खुप बघ आहे झाली . "
डोकेदुखी नसे आईला
अशी रात्र वर्षाने आली
बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ओठ चावला दाताखाली
मुठीत 'आय पिल' चे पुडके
असे बोलुनी पोरा तीने,
जरा -जारासे थोपटले .
बाबा मोकळे होऊन आले
बाथ्रुममधला फ्लश बोले
नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
जरा झोपु दे त्याला आणिक
आपण भक्त प्रल्हाद पाहू
पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
बाबा म्हणती तुमचे चालू द्या
हात काँग्रेसचा मजला बरा
"खर्च वाचेल गोळ्यांचा अन
पैसेही साठतील खुप
बाबा हाती धुपाटणे अन
गेले तेल अन गेले तूप
बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
झोपत नाही हा कार्टा तर
पहावे एपिसोड सिरियलचे
बघुनी पाणी डोळ्यां मधले
पोर जरासे बावरते
बाबा आता घोरत दीर्घ
आईलाही जांभई येते
माय म्हणे , "माझ्या पोरा
हा मायेचा वाही झरा ,
झोप जगाला आणण्यासाठी
असल्या पुचाट कविता करा
- वस्तुनिष्ठ
जंक्शन
कुण्या सकाळी कवि खरडतो
मारुनमुटकुन कविता एक
जुन्या कल्पना घासुनिपुसुनि
फेक जरा तू पुन्हा फेक
मोर म्हणजे काय हो बाबा
पोर विचारी बापाला
मोर भारी शिग्रेट असते
बाप खेकसे पोराला
"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
केतकी आता म्हातारी झाली
तुझी तू दुसरी शोध ना बाबा
खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतो अपुले पोर.
काय? 'हैदोस' तुझ्या हातात?
बापापेक्षा पोरच थोर
खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
बाबा आता काय उपयोग?
तुम्ही तर राळे सुपातले
"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
ऍन्ड्रोपॉज निव्वळ थाप
अजुनि कणखर बघ प्रकृती
"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले ककीळ कुंजन..?
चौफुल्यावर दौलतजादा
बाई असली झकास जंक्शन
"पुर्वीची ती माणसे पोरा
खुप खुप मागस होती
'केसरी' च्या सेकंड हनीमूनला
वायग्रा घेऊन जात होती
"भात म्हणुनी तांदुळ अख्खा
शिजवुनी ते होते खात
चाळीशीतल्या मधुमेहाने
लिबिडोचीही लागे वाट
"आता कशी बघ आपण
जेवण म्हणुनी खातो गोळी
मुक्त नागवे सगळे आपण
कुठली साडी कुठली चोळी
"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
कसली पुचाट तुझी जवानी
स्वप्नी मल्लीका, मिठीत उशी
"झोप आता पोरा गुपचुप
रात्र खुप बघ आहे झाली . "
डोकेदुखी नसे आईला
अशी रात्र वर्षाने आली
बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ओठ चावला दाताखाली
मुठीत 'आय पिल' चे पुडके
असे बोलुनी पोरा तीने,
जरा -जारासे थोपटले .
बाबा मोकळे होऊन आले
बाथ्रुममधला फ्लश बोले
नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
जरा झोपु दे त्याला आणिक
आपण भक्त प्रल्हाद पाहू
पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
बाबा म्हणती तुमचे चालू द्या
हात काँग्रेसचा मजला बरा
"खर्च वाचेल गोळ्यांचा अन
पैसेही साठतील खुप
बाबा हाती धुपाटणे अन
गेले तेल अन गेले तूप
बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
झोपत नाही हा कार्टा तर
पहावे एपिसोड सिरियलचे
बघुनी पाणी डोळ्यां मधले
पोर जरासे बावरते
बाबा आता घोरत दीर्घ
आईलाही जांभई येते
माय म्हणे , "माझ्या पोरा
हा मायेचा वाही झरा ,
झोप जगाला आणण्यासाठी
असल्या पुचाट कविता करा
- वस्तुनिष्ठ
Tuesday, March 31, 2009
धोंडोपंतांचे निवेदन
.
आदरणीयद धोंडोपंत ह्यांचे कडून आलेले निवेदन :
------------------------
मा. मिसळप्रेमी...
हे निवेदन आम्ही आमच्या ब्लॉगावर प्रकाशित केले होते. मात्र स्वस्तखाद्यपदार्थनामधारी संस्थळाचा उल्लेखही आमच्या ब्लॉगावर नको म्हणून तुमच्याकडे देत आहे.
आपला,
(विचक्षण) धोंडोपंत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
लोकहो,
आज आमच्या काही स्नेह्यांनी आणि वाचकांनी फोन आणि निरोपकाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधून एका संकेतस्थळावर आमच्या संदर्भात असलेले लेखन, ज्यात आमचाबद्दल काही चांगले लिहिले गेले होते, असे लेखन, त्या संकेतस्थळाच्या मालकांनी आकसापोटी उडविले असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्या संकेतस्थळावरील काही सदस्यांनी मालकांना आमच्याबद्दलचे लेखन उडविण्याच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे आम्हाला सांगण्यात आले.
लोकहो, त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर कोणते लेखन ठेवायचे आणि कोणते उडवायचे हा त्या माननीय मालकांचा आणि आदरणीय प्रशासकांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही काय बोलणार? आमचा तो विषय नाही.
त्यामुळे तेथे आमच्या संदर्भातील लेखन उडविले गेले किंवा आमच्याबद्दल काही गरळ ओकली गेली तर तुम्ही अस्वस्थ होऊ नका आणि त्याला विरोध करू नका आणि आमच्यामुळे तुमचा अपमान करून घेऊ नका हेच सांगण्यासाठी हे निवेदन.
खरेतर, आम्ही जेव्हा त्या संस्थळावरून बाहेर पडलो त्यावेळेस मालकांना स्वत:हून अनेकदा विनंती केली होती की आम्ही जे लेखन तुमच्या संस्थळावर केले आहे ते सर्व उडवून टाकावे. ही विनंती गुगल निरोपकावर तसेच फोनवरही केली होती. त्यात आमचा उद्देश हा होता की आमच्यामागे आमचे लेखन रहायला नको. आम्ही एखादे ठिकाण सोडल्यावर आमच्या पाऊलखुणा मागे राहू नयेत असे आमचे मत आहे. पण मालकांचा आमच्यावर नसला तरी आमच्या लेखनावर फार जीव. त्यामुळे ते आम्ही केलेल लेखन उडवत नाहीत आणि आमच्याबद्दल कुणी काही चांगले बोललेलेही त्यांना खपत नाही.
(किमान या लेखामुळे तरी मालकांचा पारा चढून मालक आमचे सर्व लेख आणि सदरे त्या संस्थळावरून उडवतील अशी आशा करूया. कारण मालक आमचा ब्लॉग वाचतात आणि काहीवेळा त्यांच्या खास शैलीतले अभिप्रायही इथे ठोकतात. अर्थात ते आम्ही इथे प्रकाशित करत नाही. तर या लेखामुळे मालकांचा पारा चढून आमचे सर्व लेख तेथून उडविले जातील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. तसे झाले तर फारच उत्तम होईल. असो.)
तर सांगायची गोष्ट अशी की, आम्ही सध्या फक्त आमच्या ब्लॉगावर आणि आमच्या एका स्नेह्यांच्या गझलेच्या संकेतस्थळावर व काही ऑर्कूटसमूहावर लेखन करतो. रसिकजनांच्या आग्रहाखातर "सांजवेळ" हा मराठी ललितलेखनाला वाहिलेला ब्लॉगही सुरू केला आहे.
छंदशास्त्रावरील आमचे आगामी लेखन तिथे होणार आहे. त्यामुळे काव्यप्रेमींच्या "छंदशास्त्राचे काय?" या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे.
लोकहो, एखाद्याने डोक्यावर पांघरूण घेतले म्हणजे सूर्योदय टाळता येत नाही. नदीचा ओघ कुणीही थोपवू शकत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याला रसिकमान्यता प्राप्त होणारचं आणि लोकाश्रय मिळणारच. त्यामुळे कुठेही आमचे लेखन उडवले तरी काळजीचे कारण नाही. कारण
गटारात खुपसुनी माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
नुसता स्वतःच्या नावाचा गवगवा करून, ठराविक लोकांना आपल्यामागे लेझिम खेळायला लावून आणि आपले कंपू उभारून कुणीही खर्या अर्थाने मोठा होत नसतो. बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे.
आमच्या कुंडलीत तृतीयस्थानाची आणि दशमाची दशा सुरू आहे. हा कालावधी लेखनाच्या माध्यमातून अफाट प्रसिद्धी, समाजमान्यता, कीर्ति आणि लोकाश्रय दाखवतो. त्याची अनुभूती आम्ही घेत आहोतच. त्यामुळे कोणी कितीही काहीही हलकटपणा केला, तरी त्यातून आम्हाला काहीही फरक पडत नाही.
आमचे सुजनत्व आणि स्वायत्तता यांच्याशी तडजोड आम्ही कधीही करणार नाही.
आमच्या लेखनाचा फैसला आम्ही तमाम मराठी जनतेवर सोडला आहे आणि त्या मराठी माणसांच्या निर्णयक्षमतेवर आणि सृजनशीलतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दादांनी म्हटले आहे की,
अरे या जिंदगानीची कधी मी काळजी केली?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती
या माय मराठीची सेवा करत आम्ही जगू. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि संस्कृती यासाठी सर्वस्व देऊ.
हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण!
तेथे आम्ही शुद्ध रसपान करू आणि आमच्या लेखणीतून जास्तीत जास्त चांगले आणि सकस लेखन मराठीला देण्याचा प्रयत्न करू.
आणि सर्व मराठी बांधवानांही आमच्या सोबत घेऊन त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करू.
चल ये रे, ये रे गड्या
नाचू दो घालू फुगड्या
खेळू झिम्मा, झिम पोरी, झिम पोरी,
झिम पोरी झिम पोरी झिम
आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत
आदरणीयद धोंडोपंत ह्यांचे कडून आलेले निवेदन :
------------------------
मा. मिसळप्रेमी...
हे निवेदन आम्ही आमच्या ब्लॉगावर प्रकाशित केले होते. मात्र स्वस्तखाद्यपदार्थनामधारी संस्थळाचा उल्लेखही आमच्या ब्लॉगावर नको म्हणून तुमच्याकडे देत आहे.
आपला,
(विचक्षण) धोंडोपंत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
लोकहो,
आज आमच्या काही स्नेह्यांनी आणि वाचकांनी फोन आणि निरोपकाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधून एका संकेतस्थळावर आमच्या संदर्भात असलेले लेखन, ज्यात आमचाबद्दल काही चांगले लिहिले गेले होते, असे लेखन, त्या संकेतस्थळाच्या मालकांनी आकसापोटी उडविले असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्या संकेतस्थळावरील काही सदस्यांनी मालकांना आमच्याबद्दलचे लेखन उडविण्याच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे आम्हाला सांगण्यात आले.
लोकहो, त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर कोणते लेखन ठेवायचे आणि कोणते उडवायचे हा त्या माननीय मालकांचा आणि आदरणीय प्रशासकांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही काय बोलणार? आमचा तो विषय नाही.
त्यामुळे तेथे आमच्या संदर्भातील लेखन उडविले गेले किंवा आमच्याबद्दल काही गरळ ओकली गेली तर तुम्ही अस्वस्थ होऊ नका आणि त्याला विरोध करू नका आणि आमच्यामुळे तुमचा अपमान करून घेऊ नका हेच सांगण्यासाठी हे निवेदन.
खरेतर, आम्ही जेव्हा त्या संस्थळावरून बाहेर पडलो त्यावेळेस मालकांना स्वत:हून अनेकदा विनंती केली होती की आम्ही जे लेखन तुमच्या संस्थळावर केले आहे ते सर्व उडवून टाकावे. ही विनंती गुगल निरोपकावर तसेच फोनवरही केली होती. त्यात आमचा उद्देश हा होता की आमच्यामागे आमचे लेखन रहायला नको. आम्ही एखादे ठिकाण सोडल्यावर आमच्या पाऊलखुणा मागे राहू नयेत असे आमचे मत आहे. पण मालकांचा आमच्यावर नसला तरी आमच्या लेखनावर फार जीव. त्यामुळे ते आम्ही केलेल लेखन उडवत नाहीत आणि आमच्याबद्दल कुणी काही चांगले बोललेलेही त्यांना खपत नाही.
(किमान या लेखामुळे तरी मालकांचा पारा चढून मालक आमचे सर्व लेख आणि सदरे त्या संस्थळावरून उडवतील अशी आशा करूया. कारण मालक आमचा ब्लॉग वाचतात आणि काहीवेळा त्यांच्या खास शैलीतले अभिप्रायही इथे ठोकतात. अर्थात ते आम्ही इथे प्रकाशित करत नाही. तर या लेखामुळे मालकांचा पारा चढून आमचे सर्व लेख तेथून उडविले जातील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. तसे झाले तर फारच उत्तम होईल. असो.)
तर सांगायची गोष्ट अशी की, आम्ही सध्या फक्त आमच्या ब्लॉगावर आणि आमच्या एका स्नेह्यांच्या गझलेच्या संकेतस्थळावर व काही ऑर्कूटसमूहावर लेखन करतो. रसिकजनांच्या आग्रहाखातर "सांजवेळ" हा मराठी ललितलेखनाला वाहिलेला ब्लॉगही सुरू केला आहे.
छंदशास्त्रावरील आमचे आगामी लेखन तिथे होणार आहे. त्यामुळे काव्यप्रेमींच्या "छंदशास्त्राचे काय?" या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे.
लोकहो, एखाद्याने डोक्यावर पांघरूण घेतले म्हणजे सूर्योदय टाळता येत नाही. नदीचा ओघ कुणीही थोपवू शकत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याला रसिकमान्यता प्राप्त होणारचं आणि लोकाश्रय मिळणारच. त्यामुळे कुठेही आमचे लेखन उडवले तरी काळजीचे कारण नाही. कारण
गटारात खुपसुनी माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
नुसता स्वतःच्या नावाचा गवगवा करून, ठराविक लोकांना आपल्यामागे लेझिम खेळायला लावून आणि आपले कंपू उभारून कुणीही खर्या अर्थाने मोठा होत नसतो. बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे.
आमच्या कुंडलीत तृतीयस्थानाची आणि दशमाची दशा सुरू आहे. हा कालावधी लेखनाच्या माध्यमातून अफाट प्रसिद्धी, समाजमान्यता, कीर्ति आणि लोकाश्रय दाखवतो. त्याची अनुभूती आम्ही घेत आहोतच. त्यामुळे कोणी कितीही काहीही हलकटपणा केला, तरी त्यातून आम्हाला काहीही फरक पडत नाही.
आमचे सुजनत्व आणि स्वायत्तता यांच्याशी तडजोड आम्ही कधीही करणार नाही.
आमच्या लेखनाचा फैसला आम्ही तमाम मराठी जनतेवर सोडला आहे आणि त्या मराठी माणसांच्या निर्णयक्षमतेवर आणि सृजनशीलतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दादांनी म्हटले आहे की,
अरे या जिंदगानीची कधी मी काळजी केली?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती
या माय मराठीची सेवा करत आम्ही जगू. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि संस्कृती यासाठी सर्वस्व देऊ.
हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण!
तेथे आम्ही शुद्ध रसपान करू आणि आमच्या लेखणीतून जास्तीत जास्त चांगले आणि सकस लेखन मराठीला देण्याचा प्रयत्न करू.
आणि सर्व मराठी बांधवानांही आमच्या सोबत घेऊन त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करू.
चल ये रे, ये रे गड्या
नाचू दो घालू फुगड्या
खेळू झिम्मा, झिम पोरी, झिम पोरी,
झिम पोरी झिम पोरी झिम
आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत
Saturday, March 28, 2009
डार्विन डार्विन काय म्हनतोस ?
प्राजुला माकड म्हंटलं म्हणून मिपावरुन उडावलेले चतुरंगाचे विडंबन.
------------
डार्विन डार्विन काय म्हनतोस ?
अरे भलताच माकड येडा दिसतोस!
तोंड लाल अन झिपरं केस
हुप्प्यावानी सारा वेष
घर ना दार
कोलांट्या फार
झाडावर लटकुन काय बसतोस ?
माकड केव्हा माणसाळला
शोधायचं हे ठाव तुला
शेपटीचा गफला
तुला ना सुटला
शोधायची बात आता काय करतोस ?
मानुस झालो असलो रं
बापुस माझा वानर रं
साधुन मोका
देतोय धोका
मानसाचा इश्वास काय धरतोस ?
चतुरंग
------------
डार्विन डार्विन काय म्हनतोस ?
अरे भलताच माकड येडा दिसतोस!
तोंड लाल अन झिपरं केस
हुप्प्यावानी सारा वेष
घर ना दार
कोलांट्या फार
झाडावर लटकुन काय बसतोस ?
माकड केव्हा माणसाळला
शोधायचं हे ठाव तुला
शेपटीचा गफला
तुला ना सुटला
शोधायची बात आता काय करतोस ?
मानुस झालो असलो रं
बापुस माझा वानर रं
साधुन मोका
देतोय धोका
मानसाचा इश्वास काय धरतोस ?
चतुरंग
Thursday, March 5, 2009
कोण होतास तू काय झालास तू :)
तात्या काय चीझ आहे हे कळावे म्हणून चाटूरंग ह्यांनी आम्हाला हा मिपावरील एक उडवलेला जुना लेख पाठवला आहे. इथे तात्याचे रुप पहा आणि आज त्याची काय अवस्था झाली आहे पाहा.
-मिसळप्रेमी
-----------------------
मिपावरुन उडालेला आणखी एक लेख. तशी शिळीच कढी आहे. पण तुम्ही उडवलेले लेखन छापता म्हणून देत आहे
-चाटूरंग
---
राम राम मंडळी,
आमचे परममित्र श्री बेसनलाडू यांनी मला एक पोष्टकार्ड पाठवले आहे. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो की या पोष्टकार्डातून लाडूसाहेबांची आमच्याबद्दल आणि मिसळपावबद्दल केवळ अन केवळ आत्मियताच दिसते! आणि तेवढी आत्मियता असल्याशिवाय उगाचच्या उगाच, वेळ काढून कुणी पानभर पत्र लिहीत नाही याची मला कल्पना आहे!
लाडूसाहेबांच्या पत्राला मी व्य नि नेच (पोष्टकार्डामार्फत) उत्तर पाठवणार होतो परंतु लाडूसाहेबांचे पत्र आणि मी त्याला दिलेले उत्तर इथे जाहीरपणे देत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की आमच्यातला व्यक्तिगत पत्रव्यवहार मी लाडूसाहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय येथे चव्हाट्यावर आणत आहे आणि त्याकरता मी लाडूसाहेबांची जाहीर माफी मागतो, तसेच त्यांचा राग सहन करण्याचीही माझी तयारी आहे!
परंतु सदर पत्र हे मिसळपावच्या हिताशी संबंधित आहे, त्यात इतर कुठलाच व्यक्तिगत संदर्भ नाही म्हणूनच मी ते येथे जाहीरपणे देत आहे, एवढेच सांगू इच्छितो!
धन्यवाद,
आपलाच,
तात्या अभ्यंकर.
सुरवातीला लाडूसाहेबांचे संपूर्ण पत्र लाल अक्षरात -
नमस्कार तात्या,
गेल्या दोन वर्षांपेक्षा थोडा जास्त काळ मराठी संकेतस्थळांवरील एक परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्याच्याने ओळखल्या जाणार्या तात्या अभ्यंकरांचा मनस्वी शुभचिंतक म्हणून हा निरोप तुमच्यासाठी. मी शिवराळच आहे, मी फाटक्या तोंडाचाच आहे, मी नंगा फकीरच आहे, अशा सबबींखाली सार्वजनिक सभ्यता आणि शिष्टाचार 'रिप्लेस' करता येत नाही, असे मला वाटते. आणि सार्वजनिक शरमेचे वावडेच असेल, तर कोकणी आणि देशी शिव्या, आयमाय असलेल्या आणि नसलेल्या शिव्या असे डिस्टिंक्शन तरी कशाला? प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा. पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही. १००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते. अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे. असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत? मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे? की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते. त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
या अनुषंगाने अत्यानंदकाकांचा तुमच्या खरडवहीतील पुढील प्रतिसाद पाहण्यात आला आणि म्हटले मलाही असेच वाटते आहे, ते तुमच्या कानावर घालावे -
जाता जाता तुला एक प्रेमळ सल्ला! उठसुठ अशा शिव्या देत जाऊ नकोस. त्यामुळे तुझ्याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज उगीचच वाढतात आणि तुझ्या सद्गुणांकडे दूर्लक्ष होते.. रोखठोक बोल पण भाषा मात्र अशी शिवराळ नको. मित्रांच्या अड्ड्यात अशी भाषा चालून जाते ; पण सार्वजनिक स्थळी तरी तुझ्यासारख्या एका संस्थ च्या मालकाने असे बोलणे केव्हाही योग्य नव्हे .
कदाचित मी वयाच्या, अनुभवाच्या आणि अधिकाराच्या मानाने फारच जास्त, नको ते बोलत असेन; पण तुमचा हितचिंतक म्हणून बोलतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. मला जे म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेल, अशी आशा करतो.
सस्नेह,
बेसनलाडू.
आता लाडूसाहेबांच्या पत्रातील मुद्द्यांना माझे उत्तर निळ्या अक्षरात -
प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा.
First of all, to be very frank with you, मी एकही प्रतिसाद उडवत नाही, किंवा संपादितही करत नाही.
पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही.
तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु पंचायत समितीने माझे शिव्यांचे प्रतिसाद अगदी बिनदिक्कत संपादित करावे किंवा काढूनही टाकावे, माझं काहीच म्हणणं नाही. कुणा एका माणसाच्या मर्जीवर एखादे संकेतस्थळावरील लेखन, प्रतिसाद, संपादन अवलंबून असावे याच्या मी पहिल्यापासूनच विरोधात होतो, लोकशाहीचा कट्टर समर्थक होतो/आहे. आणि म्हणूनच जी माणसं माझ्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, मालक म्हणून माझी जराही भीडभाड बाळगणार नाहीत, किंवा मी त्यांना पंचायत समितीचे सदस्य नेमले आहे म्हणून माझे मिंधेही होणार नाहीत, अशीच माणसं मी पंचायत समितीवर नेमली आहेत. आता ही मंडळी माझे शिव्यांचे प्रतिसाद काढून टाकत नाहीत किंवा संपादित करत नाहेत याला माझा काय इलाज सांग बरं!
पंचायत समितीपैकी तू कुणालाही विचार, मी अगदी सुरवातीपासूनच त्यांना माझ्या बरोबरीचे मानत आलो आहे, त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीकरता संपूर्ण मुभा दिली आहे, तसेच मी मालक आहे तेव्हा मला काही विशेष सवलती हव्यात असा उच्चारही कधी केलेला नाही. आता यापेक्षा अधिक मी काय करायला हवं सांग बघू. लेखन-प्रतिसादाच्या बाबतीत पूर्ण अभिव्यक्ति स्वातंत्र्य असावं, आंतरजालावरील मराठी भाषेच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता माझाही खारीचा हातभार लागावा, या हेतूने मी हे संकेतस्थळ काढलं, बोलल्याप्रमाणे इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही रुजवायचा प्रयत्न केला, आणि माझे जराही मिंधे नसलेल्या व्यक्तिंना संपादनाचे सर्व अधिकार दिले, यात माझं काही चुकलं का ते सांग बरं!
१००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते.
The point is very well noted Sir! However, I do not promise anything, but will try my level best! )
अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे.
वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. उलटपक्षी माझ्याबद्दल किंवा मिसळपावबदल प्रामाणिक आत्मियता असल्याशिवाय एखादा माणूस वेळ काढून पानभर पत्र लिहीत नाही/लिहिणार नाही! In fact, I am obliged!
>>असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत?
पंचायत समितीने! )
मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे?
चुकलं माझं! मी वेलणकरशेठची आणि सर्व संबंधितांची जाहीर क्षमा मागतो! आज मराठी संकेतस्थळांवर मी कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु जो काही आहे तो वेलणकरशेठमुळेच आहे!
की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते.
खरं आहे तुझं! सालं सांभाळलं पाहिजे यापुढे!
Sorry Boss...!
त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
यापुढे काळजी घेईन...
तात्या.
-मिसळप्रेमी
-----------------------
मिपावरुन उडालेला आणखी एक लेख. तशी शिळीच कढी आहे. पण तुम्ही उडवलेले लेखन छापता म्हणून देत आहे
-चाटूरंग
---
राम राम मंडळी,
आमचे परममित्र श्री बेसनलाडू यांनी मला एक पोष्टकार्ड पाठवले आहे. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो की या पोष्टकार्डातून लाडूसाहेबांची आमच्याबद्दल आणि मिसळपावबद्दल केवळ अन केवळ आत्मियताच दिसते! आणि तेवढी आत्मियता असल्याशिवाय उगाचच्या उगाच, वेळ काढून कुणी पानभर पत्र लिहीत नाही याची मला कल्पना आहे!
लाडूसाहेबांच्या पत्राला मी व्य नि नेच (पोष्टकार्डामार्फत) उत्तर पाठवणार होतो परंतु लाडूसाहेबांचे पत्र आणि मी त्याला दिलेले उत्तर इथे जाहीरपणे देत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की आमच्यातला व्यक्तिगत पत्रव्यवहार मी लाडूसाहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय येथे चव्हाट्यावर आणत आहे आणि त्याकरता मी लाडूसाहेबांची जाहीर माफी मागतो, तसेच त्यांचा राग सहन करण्याचीही माझी तयारी आहे!
परंतु सदर पत्र हे मिसळपावच्या हिताशी संबंधित आहे, त्यात इतर कुठलाच व्यक्तिगत संदर्भ नाही म्हणूनच मी ते येथे जाहीरपणे देत आहे, एवढेच सांगू इच्छितो!
धन्यवाद,
आपलाच,
तात्या अभ्यंकर.
सुरवातीला लाडूसाहेबांचे संपूर्ण पत्र लाल अक्षरात -
नमस्कार तात्या,
गेल्या दोन वर्षांपेक्षा थोडा जास्त काळ मराठी संकेतस्थळांवरील एक परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्याच्याने ओळखल्या जाणार्या तात्या अभ्यंकरांचा मनस्वी शुभचिंतक म्हणून हा निरोप तुमच्यासाठी. मी शिवराळच आहे, मी फाटक्या तोंडाचाच आहे, मी नंगा फकीरच आहे, अशा सबबींखाली सार्वजनिक सभ्यता आणि शिष्टाचार 'रिप्लेस' करता येत नाही, असे मला वाटते. आणि सार्वजनिक शरमेचे वावडेच असेल, तर कोकणी आणि देशी शिव्या, आयमाय असलेल्या आणि नसलेल्या शिव्या असे डिस्टिंक्शन तरी कशाला? प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा. पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही. १००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते. अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे. असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत? मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे? की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते. त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
या अनुषंगाने अत्यानंदकाकांचा तुमच्या खरडवहीतील पुढील प्रतिसाद पाहण्यात आला आणि म्हटले मलाही असेच वाटते आहे, ते तुमच्या कानावर घालावे -
जाता जाता तुला एक प्रेमळ सल्ला! उठसुठ अशा शिव्या देत जाऊ नकोस. त्यामुळे तुझ्याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज उगीचच वाढतात आणि तुझ्या सद्गुणांकडे दूर्लक्ष होते.. रोखठोक बोल पण भाषा मात्र अशी शिवराळ नको. मित्रांच्या अड्ड्यात अशी भाषा चालून जाते ; पण सार्वजनिक स्थळी तरी तुझ्यासारख्या एका संस्थ च्या मालकाने असे बोलणे केव्हाही योग्य नव्हे .
कदाचित मी वयाच्या, अनुभवाच्या आणि अधिकाराच्या मानाने फारच जास्त, नको ते बोलत असेन; पण तुमचा हितचिंतक म्हणून बोलतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. मला जे म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेल, अशी आशा करतो.
सस्नेह,
बेसनलाडू.
आता लाडूसाहेबांच्या पत्रातील मुद्द्यांना माझे उत्तर निळ्या अक्षरात -
प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा.
First of all, to be very frank with you, मी एकही प्रतिसाद उडवत नाही, किंवा संपादितही करत नाही.
पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही.
तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु पंचायत समितीने माझे शिव्यांचे प्रतिसाद अगदी बिनदिक्कत संपादित करावे किंवा काढूनही टाकावे, माझं काहीच म्हणणं नाही. कुणा एका माणसाच्या मर्जीवर एखादे संकेतस्थळावरील लेखन, प्रतिसाद, संपादन अवलंबून असावे याच्या मी पहिल्यापासूनच विरोधात होतो, लोकशाहीचा कट्टर समर्थक होतो/आहे. आणि म्हणूनच जी माणसं माझ्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, मालक म्हणून माझी जराही भीडभाड बाळगणार नाहीत, किंवा मी त्यांना पंचायत समितीचे सदस्य नेमले आहे म्हणून माझे मिंधेही होणार नाहीत, अशीच माणसं मी पंचायत समितीवर नेमली आहेत. आता ही मंडळी माझे शिव्यांचे प्रतिसाद काढून टाकत नाहीत किंवा संपादित करत नाहेत याला माझा काय इलाज सांग बरं!
पंचायत समितीपैकी तू कुणालाही विचार, मी अगदी सुरवातीपासूनच त्यांना माझ्या बरोबरीचे मानत आलो आहे, त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीकरता संपूर्ण मुभा दिली आहे, तसेच मी मालक आहे तेव्हा मला काही विशेष सवलती हव्यात असा उच्चारही कधी केलेला नाही. आता यापेक्षा अधिक मी काय करायला हवं सांग बघू. लेखन-प्रतिसादाच्या बाबतीत पूर्ण अभिव्यक्ति स्वातंत्र्य असावं, आंतरजालावरील मराठी भाषेच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता माझाही खारीचा हातभार लागावा, या हेतूने मी हे संकेतस्थळ काढलं, बोलल्याप्रमाणे इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही रुजवायचा प्रयत्न केला, आणि माझे जराही मिंधे नसलेल्या व्यक्तिंना संपादनाचे सर्व अधिकार दिले, यात माझं काही चुकलं का ते सांग बरं!
१००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते.
The point is very well noted Sir! However, I do not promise anything, but will try my level best! )
अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे.
वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. उलटपक्षी माझ्याबद्दल किंवा मिसळपावबदल प्रामाणिक आत्मियता असल्याशिवाय एखादा माणूस वेळ काढून पानभर पत्र लिहीत नाही/लिहिणार नाही! In fact, I am obliged!
>>असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत?
पंचायत समितीने! )
मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे?
चुकलं माझं! मी वेलणकरशेठची आणि सर्व संबंधितांची जाहीर क्षमा मागतो! आज मराठी संकेतस्थळांवर मी कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु जो काही आहे तो वेलणकरशेठमुळेच आहे!
की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते.
खरं आहे तुझं! सालं सांभाळलं पाहिजे यापुढे!
Sorry Boss...!
त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
यापुढे काळजी घेईन...
तात्या.
Subscribe to:
Posts (Atom)